फलटण प्रकरणातील ट्रँगल लोकांसमोर आणण्यासारखा नाही - मंत्री गोरे
.jpg)
रामराजेंनी राजकीय पुनर्वसनाचा मार्ग शोधू नये...
डाॅक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पुतळा उभारणार, भाऊबीज साजरी करणार नाही, असे वक्तव्य केले आहे, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर गोरे यांनी चांगल्या माणसांचं नाव घ्या, असे सांगत राजकीय अस्तित्व गमाविलेली ही माणसे या प्रकरणाच्या आडून राजकीय पुनर्वसनाचा मार्ग शोधत आहेत. त्यांनी याचे भांडवल करू नये. जनता भोळी राहिलेली नाही. ४० वर्षे जनतेने तुम्हाला पाहिलंय. उगाच राजकारण करू नका, असा टोला लगावला.
संजय राऊत यांनी दोन महिने खोटे बोलायचं नाही असं ठरवलं असावं...
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही मंत्री गोरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना टीका केली. त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती घेतलेली नाही. त्यामुळे बोलणे उचित नाही, पण त्यांनी ठरवलं असावं वर्षांतील दोन महिने खोटे बोलायचे नाही. त्यामुळे त्यांनी माैन बाळगलं असावं, अशीही टीका केली.
तो महेबूब आयोग असलातरी चालेल...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना या प्रकरणाच्या तपासासाठी कुठला आयोग स्थापन करायचा असेल, तर त्यांनी नाव सुचवावे, मग तो महेबूब आयोग असला तरी आम्हाला चालेल. मात्र, त्यानंतर जे वास्तव पुढे येईल ते सर्वांना स्वीकारावे लागेल, असे गोरे यांनी सांगितले.
नऊ नोव्हेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद...
कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन हे नऊ नोव्हेंबरपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे भाविकांना सहज आणि सुलभ दर्शन मिळेल, तसेच यंदा अतिवृष्टीमुळे पंढरपूरला वारीत भाविकांची संख्या कमी आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत कदाचित भाविक घेऊ शकतात, असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
Comments